बचत खाती आपल्याला गरीब का बनवत आहेत ? - Jar ॲप

January 5, 2023

आपले पैसे बचत खात्यामध्ये ठेवणे आपल्याला गरीब कसे बनवित आहे यामागील कारणे शोधा आणि आपल्याकडे अन्य कोणते पर्याय आहेत याचाही अभ्यास करा.

आपल्याला महिन्याच्या महिन्याला पगार मिळणे  ही जगातील सर्वात चांगली भावना आहे, नाही का?

आपल्या हयातीत आपण आठवड्याचे 40-50 तास 30-40 वर्षे कष्ट करून पगारासारख्या मूलभूत गोष्टीसाठी काम करतो, ज्यामुळे आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतो.

उदरनिर्वाह तर करावाच लागेल. आम्ही ते पैसे आमच्या बचत खात्यात ठेवतो जेणेकरून जेव्हा आम्हाला गरज असेल तेव्हा आमच्याकडे रोख रक्कम सहज उपलब्ध होईल.

बचत खाती वर्षाकाठी सुमारे 2 ते 4% व्याज देतात. गुंतवणुकीवरचा हा सर्वोत्तम परतावा नसेलही, पण काहीच न मिळण्यापेक्षा तो नक्कीच चांगला आहे.

 

तर मग बचत खाते आपल्याला गरीब कसे बनवत आहे ?

 

याचे उत्तर म्हणजे महागाई.

 

दुर्दैवाने, भारतात महागाईचा जगातील सर्वात जास्त दर आहे, परंतु काळजी करू नका आपण महागाईवर मात करू शकता, हे 3 सोपे उपाय इथे पाहा.

मूलभूत गरजांच्या खर्चांमध्येही वर्षानुवर्षे वाढ होत असल्याने महागाईची चिंता सर्वांनाच सतावते आहे.

आजच्या बाजारात सध्या चलनवाढीचा दर 6% किंवा त्याहून अधिक आहे. मेट्रो क्षेत्रात याचे प्रमाण जास्त आहे.

याचा अर्थ असा की, बँक खात्यातील पैसा, जो वाढत नाही, तो तुमची संपत्ती सातत्याने कमी करतो.

 

जर आपण थोडे गणित केलेत, तर आपल्या लक्षात येईल की, 10-15 वर्षांच्या काळात आपली क्रयशक्ती 20%-30% पर्यंत कमी होईल.

आणि जर आपण मागे वळून पाहिले, तर महागाईचे दर हे लोक त्यांच्या बँक खात्यात जे कमावतात त्यापेक्षा अधिक असतो.

त्यामुळे आपल्या बचती पेक्षा खर्चात झपाट्याने वाढ होत असल्यामुळे आपल्या बचत खात्यात असलेल्या पैशाचे मूल्य सातत्याने कमी होत जाईल.

याचा सामना करण्यासाठी आणि आपला पैसा महागाईच्या बरोबरीने वाढवण्यासाठी, गुंतवणूक करा.

 

आपल्या लक्षात आलं असेल, की गेल्या काही वर्षांमध्ये -

 

●       आपला किराणा मालाचा खर्च वाढला आहे.

●       आपल्या फळभाज्यांची किंमत वाढली आहे.

●       आपल्या घराचे भाडे वाढले आहे.

●       आपला वैद्यकीय खर्च वाढला आहे.

●       आपल्या सिनेमाच्या तिकिटाची किंमत वाढली आहे.

●       रेस्टॉरंटमधील आपले बिल वाढले आहे.

●       जवळजवळ सर्व वस्तू आणि सेवांच्या किंमती वाढल्या आहेत.

चला एका छोट्या उदाहरणाने सुरुवात करूया:

बचत खात्याचे व्याजदर सरासरी 3.5% आहेत, तर भारतातील चलनवाढीचा दर सरासरी 4.5% आहे.

म्हणून जर आपण बचत खात्यात ₹100 ठेवलेत आणि वार्षिक 3.5% व्याज मिळवलीत, तर आपली गुंतवणूक एका वर्षानंतर ₹103.5 इतकी होईल.

परंतु ज्या गोष्टींची किंमत एक वर्षापूर्वी ₹100 होती, त्यांची किंमत आता ₹104.5 इतकी आहे. हळूहळू, वर्षानुवर्षे, ही दरी अधिकच रुंदावत जाईल.

याचा अर्थ असा आहे की जरी आपण बचत खात्यात पैसे ठेवले आणि 3.5% व्याज कमावले, तरीही आपण एक वर्षापूर्वी 100 पौंडांना मिळवू शकता अशा समान वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी आपल्याला अतिरिक्त ₹ 1 ची आवश्यकता असेल.

चलनवाढ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी येथे आणखी एक उदाहरण आहे:

पर्णिका, श्रेया आणि मुस्कान या तीन मैत्रिणी आहेत. सन 2020 मध्ये या प्रत्येकाला ₹5 लाख मिळतात.

विशेषत: महामारीच्या काळात, आणीबाणीच्या प्रसंगी हा पैसा आवश्यक आहे. ते सर्वजण वेगवेगळी रणनीती आखतात.

 

●        पर्णिकाला रोख रक्कम घेऊन काम करायला आवडतं. ती तिच्या बचत खात्यात पैसे ठेवते.

●       श्रेया आपत्कालीन निधी तयार करण्यासाठी कोणत्याही पर्यायाबद्दल अनभिज्ञ आहे. त्यामुळे ती आपल्या बँक खात्यातही पैसे साठवते.

●        मुस्कानला लिक्विड फंडाच्या फायद्यांविषयी माहिती आहे आणि ती तिचे पैसे त्यात गुंतवते.

 

पुढील 20 वर्षांत गुंतवणुकीची किंमत काय असेल?

●       दरवर्षी पर्णिकाच्या गुंतवणुकीची खरी किंमत कमी होत जाते. बँक खात्यात 20 वर्षानंतर जमा झालेल्या ₹5 लाखची किंमत फक्त ₹2.07 लाख असेल. हे मूल्यात 50% पेक्षा जास्त घट आहे. ही सर्वात भयानक श्रेणी आहे.

●       20 वर्षांत श्रेयाच्या गुंतवणुकीचे खरे मूल्य ₹ पाच लाख वरून ₹4.12 लाखांवर येईल. हे तितके काही चांगले नाही।

●       मुस्कानची गुंतवणूक वास्तविक दृष्टीने ₹5 लाखांवरून ₹8.32 लाखांवर जाईल. तिच्या बचत खात्यात असलेली रकमेपेक्षा ही जवळजवळ डबल आहे.

 

ओपन गव्हर्नमेंट डेटा प्लॅटफॉर्मच्या लेटेस्ट डेटानुसार, महागाई व्यतिरिक्त, इतर काही आकडेवारी  लक्षात ठेवण्यासारखी आहेत.

●       ₹10,000 वरील कोणतेही व्याज आपल्या उत्पन्नात जोडले जाते आणि प्रचलित आयकर दराने त्यावर कर आकारला जातो. जर आपण 5 ते 10 एल.पी.ए(LPA) रुपयांदरम्यान कमावत असाल तर ते आपल्या बचत उत्पन्नावर 20 टक्के उत्पन्न व्याज आहे. 3.5 - 4% बचत व्याजातून 20% काढल्यास 2.8 - 3.2% मिळते, याने आपल्याला नक्कीच तोटा होईल.

●       जरी आपण 2.5 - 5 एल.पी.ए(LPA) उत्पन्नाच्या स्लॅबमध्ये येत असाल, तरीही बचत खात्या वरील व्याज  जोडल्यानंतर आपल्या अंतिम उत्पन्नावर अवलंबून करानंतर प्रभावी नफा 2.8 ते 3.8% दरम्यान असेल.

 

आपण आपले पैसे ठेवू शकता असा बचत खात्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय आहे का?

होय, एकदा का आपल्या बचत खात्यात अगदी कमीत कमी पैसे आले की आपल्या हातात असे काही पर्याय असतात, जिथे आपण आपले पैसे ठेवू शकता.

आपण हुशारीने गुंतवणूक करून उरलेल्या रकमेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत, जे तुम्हाला पुढील फायदे देतात:

●       आपल्याला चांगला व्याजदर मिळतो

●       आपले टॅक्स बिल कमी करण्यास आपल्याला मदत होते  

●       आपली नेटवर्थ वाढविण्यात आपल्याला मदत करते

 

आपले उत्पन्न आणि खर्च हे आपण कुठे, केव्हा आणि किती गुंतवणूक करता हे ठरवतात. आपल्या बचतीचा चांगला उपयोग करण्यासाठी येथे काही कल्पना आहेत:

 

1. सोन्यात गुंतवणूक

सोने ही एक मौल्यवान मालमत्ता ज्याचे मूल्य सातत्याने वाढते, ज्यामुळे ती एक सुरक्षित आणि खात्रीची गुंतवणूक बनली आहे.

गेल्या पाच वर्षांत सोन्याने 20% पेक्षा जास्त वाय.ओ.वाय.(YOY) परतावा दिला आहे. हे एक चांगले डायव्हर्सिफायर असल्याचे मानले जाते जे पोर्टफोलिओ जोखीम कमी करण्यास मदत करते.

गुंतवणूक तज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या निव्वळ गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याची गुंतवणूक 5% ते 10% असणे आवश्यक आहे. 

 

आता संपूर्ण जग डिजिटल होत असताना डिजिटल गोल्ड अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.

आता, डिजिटल गोल्ड म्हणजे काय हे विचाराल ? हा एक फिजिकल सोन्याला अससेला पर्याय आहे.

हे विनिमय दरातील हाताळणी आणि भिन्नतेपासून मुक्त आहे आणि गुंतवणूकदाराला फिजिकल सोन्याला स्पर्श न करता जगभरात सहजपणे व्यापार करण्यास मदत करते.

 

2. बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करणे

आय.ओ.यू(IOU )प्रमाणे बॉन्ड्स म्हणजे कर्जसुरक्षा. कर्जदार गुंतवणूकदारांना रोखे विकतात जे त्यांना ठराविक कालावधीसाठी पैसे देण्यास तयार असतात.

जेव्हा जोखीम टाळण्याचा विचार केला जातो, तेव्हा बॉन्ड्स नेहमीच सर्वोत्तम पर्याय आहे.

 

जेव्हा तुम्ही बॉन्ड्स खरेदी करता, तेव्हा तुम्ही जारीकर्त्याला पैसे उधार देत असता, जे कंपनी, नगरपालिका किंवा सरकार असू शकतं.

त्या बदल्यात, जारीकर्ता आपल्याला बॉन्डच्या अस्तित्वाच्या कालावधीसाठी परिभाषित व्याज दर देण्याचे वचन देतो, तसेच बॉण्डचे मुद्दल, जे मॅचुयर झाल्यावर दर्शनी मूल्य किंवा समान मूल्य म्हणून देखील ओळखले जाते, निश्चित कालावधीनंतर परतावा देण्याचे आश्वासन दिले जाते.

आपल्याला आपले मुद्दल परत मिळेल आणि गुंतवणूकीच्या संपूर्ण कालावधीत आपण कमावलेले व्याज मिळेल.

अल्प आणि मध्यम मुदतीच्या गुंतवणुकीचा विचार केला तर बॉन्ड्सचीही नोंद श्रेष्ठ असते.

 

3. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटमध्ये गुंतवणूक

सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट (सी.डी) हा व्यावसायिक बँकांद्वारे दिला जाणारा बचत खात्याचा एक प्रकार आहे जो पारंपारिक बचत खात्यांपेक्षा लक्षणीय प्रमाणात अधिक व्याज दर देताना आपण गुंतविलेले पैसे आपल्याला वापरायला प्रतिबंधित करतो.

डिपॉझिट्सचे मूल्य काळापरत्वे वाढते, परंतु ती मुदत संपण्यापूर्वी काढून घेतल्यास ती शुल्काच्या अधीन असू शकते.

हे एका आठवड्यापासून एका वर्षापर्यंत काहीही असू शकते. कमीत कमी ₹1 लाखाची गुंतवणूक आवश्यक आहे. याचे नियमन करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आर.बी.आय) आहे.

 

4. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक

म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून त्याची गुंतवणूक स्टॉक्स, बॉन्ड्स आणि अल्प मुदतीच्या कर्जांमध्ये करणारी कॉर्पोरेशन होय.

म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ हा फंडाच्या सर्व होल्डिंग्जचा मिळून बनलेला असतो. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांकडून खरेदी केले जातात.

प्रत्येक शेअर हा गुंतवणूकदाराच्या फंडाच्या मालकीचा आणि महसुलातील भाग दर्शवितो.

 

म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एस.आय.पी.) वापरून हळूहळू गुंतवणूक करणे ही हळूहळू इक्विटी पोर्टफोलिओ स्थापित करताना अस्थिरता कमी करण्यासाठी एक विलक्षण पद्धत असू शकते.

डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंडांमध्ये एस.आय.पी गुंतवणूक करावी.

 

5. इंडेक्स फंडात गुंतवणूक

शेअर बाजाराची भीती वाटणे साहजिक आहे, त्यामुळे सुरुवात लहान गोष्टीपासून करा. अशावेळी इंडेक्स फंड हा उत्तम पर्याय आहे.

यशस्वी स्टॉक्स निवडणे अत्यंत कठीण आहे, अगदी अनुभवी स्टॉक पिकर्ससाठीसुद्धा, मग कशाला त्रास करून घ्यायचा?

याउलट . इंडेक्स फंड सध्या शेअर बाजारात व्यापार करत असलेल्या जवळपास सर्व मोठ्या समभागांची खरेदी साधारणतः समान प्रमाणात करतो.

इंडेक्स फंडामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात शेअर्समध्ये (200-500) गुंतवणूक करून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणता येते.

साहजिकच, काही वर चढतील तर काही खाली पडतील, परंतु इतिहास पाहिला तर जास्त वर चढतात खाली पडणाऱ्यांपेक्षा.

ही अधिक सरळ आणि किफायतशीर गुंतवणूक पद्धती आहे.

 

6. स्टॉक्स

स्टॉक हा एक प्रकारचा गुंतवणूक पर्याय आहे जो कंपनीच्या मालकीचा एक भाग प्रतिबिंबित करतो.

गुंतवणूकदारांकडून स्टॉक्स खरेदी केले जातात ज्यांचा असा विश्वास आहे की कालांतराने त्यांचे मूल्य वाढेल.

जेव्हा आपण एखाद्या कंपनीच्या स्टॉकचा शेअर खरेदी करता, तेव्हा आपण त्या कंपनीचा एक छोटासा तुकडा विकत घेत असता.

गुंतवणूकदार मूल्य वाढतील असा विश्वास असलेल्या कंपन्यांमध्ये समभाग खरेदी करतात. असे झाल्यास कंपनीच्या शेअरचे मूल्यही वाढते.

त्यानंतर नफ्यात शेअरची विक्री करता येते.

 

गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपेक्षा स्टॉक्सची निवड करण्याचे मुख्य कारण म्हणजे स्टॉक्स अधिक परतावा देतात.

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणे सुरक्षित आहे; तरीही, कोणत्याही गुंतवणूकीप्रमाणे, सखोल अभ्यास आणि नियोजन आवश्यक आहे.

 

निष्कर्ष

लक्षात ठेवा - आधी गुंतवणूक करा, नंतर खर्च करा, शेवटी बचत करा. बहुतेक लोक पगाराचा धनादेश मिळाल्यावर प्रथम खर्च करतात आणि नंतर गुंतवणूक करतात.

आधी बचतीत पैसे गुंतवणे (सर्वसाधारणपणे, आपल्या पगाराच्या 25%) आणि मग उरलेला खर्च करणे ही एक उत्तम स्ट्रॅटेजी असेल.

शिस्त आणि सातत्य ही इथली गुरुकिल्ली आहे. शंका असल्यास आर्थिक सल्लागाराची नेमणूक करा.

मुख्य म्हणजे बचत खात्यात किंवा आपल्या घरात पैसे ठेवू नयेत. ते नेहमी लिक्विड फंडात गुंतवा.

Subscribe to our newsletter
Thank you! Your submission has been received!
Oops! Something went wrong while submitting the form.